उद्धव ठाकरे हेच दंगलीचे मास्टरमाईंड!

  160

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडताना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत दगडफेक झाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपाला भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार पलटवार करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सध्या राज्यात ज्या काही दंगली होत आहेत, त्या दंगलीचा मास्टरमाईंड हे उद्धव ठाकरे आहेत, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कालच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दंगलीमागील सूत्रधार शोधा. मी अजित पवारांना सांगेन की या ज्या दंगली होत आहेत, त्याचा मास्टरमाईंड काही दिवसांपूर्वी तुमच्या सिल्व्हर ओकमध्ये आला होता. शरद पवार साहेबांच्या शेजारी बसला होता. कलानगर त्याचा पत्ता. मी वारंवार सांगतोय, २००४ मध्ये दंगल घडवून मुख्यमंत्री होण्याची इच्छा या सुप्त डोक्यातून बाहेर पडली. ती इच्छा आणि स्वप्न अजूनही मेलेले नाही. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कारण १९९३ च्या दंगलीनंतर १९९५ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आली, असे सांगणारे उद्धव ठाकरे २००४ मध्ये तसाच प्रयत्न करत होते. २००४ मध्ये झालेल्या बैठकीला माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याची पुष्टी देऊ शकतात. उद्धव ठाकरे हे या दंगलीचे सूत्रधार आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.


राणे म्हणाले की, ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते. आता त्यांचे सूर मिळायला लागले आहेत. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. ही दंगलीची योजना आहे का? मुस्लिम समाजात दंगली घडवून मते वाढवण्याचा उद्धवजींचा डाव पुन्हा एकदा घडत आहे का? पवारसाहेबांनी हे ओळखावे, असे राणे म्हणाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने चादर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आग्रह करतात. महाराजांच्या गड किल्ल्यावर सर्वप्रथम अतिक्रमण सुरू केले. आता धार्मिक स्थळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्याही घरात देखील येतील, असे राणे म्हणाले.


कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. काँग्रेसचे खरे मनसुबे उघड झाले आहेत. त्यांना महत्त्वाचे खाते देण्याची काँग्रेसची बांधिलकी आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकसंध नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.


आम्हाला हिंदू समाजाचा पाठिंबा मिळायला हवा. कर्नाटकात जिहादी सत्तेवर आले आहेत. राज्यातही तेच चित्र रंगले. त्यासाठी रजा अकादमी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक झाली. चादर चढवणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश देणे हे पूर्व नियोजित केलेले षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या