आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत मुंबई - ठाण्याचा बोलबाला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई दहावी आणि ‘आयएससी’ बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून या दोन्ही परीक्षेत ठाणे आणि मुंबईतील विद्यार्थ्यांनी देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. बारावीच्या परीक्षेत ९९.७५ टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील इप्सिता भट्टाचार्यचा समावेश आहे. तर दहावीच्या परीक्षेत ९९.८ टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणाऱ्या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेतील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय सरदेसाई, मालाडच्या चिल्ड्रन्स ॲकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन, सोमुया चुरीवाला, श्याम मेहता, कियारा निसार, किनारे अवनिता, प्रीत जैन तर ओमकार इंटरनॅशनल शाळेतील रुद्रा मुकादम यांचा समावेश आहे.



कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन बोर्डाच्या दहावीचा निकाल ९८.९४ टक्के, तर बारावीचा निकाल ९६.९३ टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल ९९.८१ टक्के, बारावीचा निकाल ९८.३४ टक्के लागला. दहावी आणि बारावीच्या निकालात पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेलिया परीक्षेत एकूण दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन लाख ३५ हजार ११४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एक लाख २६ हजार ४७४ मुले, एक लाख आठ हजार ६४० मुली आहेत.


यंदाही मुलींची बाजी...


यावर्षी दहावीच्या परीक्षेत एकूण ९८.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत एकूण ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. आयसीएसई (दहावी) बोर्डात ९९.२१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९८.७१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. आयएससी (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत ९८.०१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९५.९६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

Comments
Add Comment

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर

Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर मुंबई : राज्याच्या