गोखले पूल मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई (प्रतिनिधी) : धोकादायक झाल्याने अंधेरीतील गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाकरिता नोव्हेंबर २०२२ पासून पूल वाहतुकीसाठी बंद आहे. मे २०२३ पर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीखालील खोदकाम पूर्ण करण्यास जुलै उजाडणार आहे. त्यामुळे एक मार्गिका नोव्हेंबर महिन्यात खुली होणार असून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी मार्च २०२४ मध्ये खुला होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरीहून बोरिवली व दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.



गोखले पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पाडून मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र रेल्वे हद्दीतील भाग हस्तांतरित होऊन दोन महिने उलटले तरी काम संथगतीने सुरू आहे. रेल्वे हद्दीत जमिनीखाली ५ मीटर खाली खोदकाम सुरू असून खोदकाम पूर्ण होण्यास जुलै महिना उजाडणार आहे. त्यामुळे पुलाचे प्रत्यक्षात काम ऑगस्ट महिन्यात सुरू होईल आणि एक लेन नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरित काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि पुलावरील वाहतूक मार्च २०२४ पासून सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.



अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला. ३ जुलै २०१८ मध्ये पुलाचा काही भाग कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोखले पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. गोखले पूल पाडून नव्याने बांधकाम करणे यासाठी आराखडा तयार करत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. अखेर गोखले पूल धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. अखेर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुलाचा भाग रेल्वे प्रशासन पाडणार असल्याचे स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने पुलाचे पाडकाम केल्यानंतर पूल बांधण्याचे काम मुंबई महापालिकेच्या पूल विभाग करणार असून यासाठी ८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर तातडीने काम हाती घेत मे अखेरपर्यंत दोन लेन सुरू करण्यात येतील, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र पूल बंद करून ७ महिने उलटले तरी पुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन होणार आहे, त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अंधेरी पूर्व व पश्चिम तसेच बोरिवलीच्या दिशेने व अंधेरीहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खेळखंडोबा होणार आहे.



अंधेरी सब वेमध्ये पाणी तुंबत असल्याने या ठिकाणी दहा पोर्टेबल पंप बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे पुलाचे बेरिंग तातडीने बदलण्यात आल्याने वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, अंधेरी मिल्लत नगर असे पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी