नऊ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने कमावले १०० कोटी

  135

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केलीय. देशात ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची अवघ्या ९ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली आहे.



या चित्रपटाच्या यशाचे श्रेय निश्चितच त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. ‘केरळ स्टोरी’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ६ व्या दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी एकाच दिवसात चांगलीच १२ कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे.



एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.



आता हा चित्रपट आणखी ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

Comments
Add Comment

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२,७१,२९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई: राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे

लोकलमधून उडी मारल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई : पश्चिम रेल्वेवर असलेल्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर एका २७ वर्षीय प्रवाशाचा चुकीच्या बाजूला उतरण्याच्या

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली. स्टेशनच्या आत असलेल्या 'मोंजिनीस केक शॉप'

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी

Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, "दोन्ही भाऊ एकत्र आले तर..."

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यामध्ये

गोरेगाव गोकुळधाममधील इमारतीत उघड्या जागेवर बकऱ्यांची कुर्बानी

स्थानिक रहिवाशांनी घेतली हरकत मुंबई (खास प्रतिनिधी): बकरी ईद निमित्त बकऱ्यांची कुर्बानी इमारती तथा गृहनिर्माण