नऊ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने कमावले १०० कोटी

  139

मुंबई (प्रतिनिधी) : ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्येही प्रदर्शित होणार आहे. सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केलीय. देशात ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ‘द केरळ स्टोरी’ची अवघ्या ९ दिवसांत १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली आहे.



या चित्रपटाच्या यशाचे श्रेय निश्चितच त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. ‘केरळ स्टोरी’ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या ६ व्या दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी एकाच दिवसात चांगलीच १२ कोटींची कमाई केली. मंगळवारपेक्षा त्यात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. त्यामुळे अवघ्या ९ दिवसांत ‘द केरळ स्टोरी’ने केलेली कमाई ही बॉलिवूड सिनेमांना दिलासादायक ठरली आहे.



एकीकडे भारतात अनेक राज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे निर्मात्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.



आता हा चित्रपट आणखी ३७ देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील प्रमुख अभिनेत्री अदा शर्मा हिने स्वत: ही माहिती पोस्ट शेअर करत दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.