संजय शिरसाट यांनी केला मोठा दावा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात यांना मिळणार संधी


संभाजीनगर : राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. या विस्तारासंदर्भात अनेक चर्चा सुरु असतानाच शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील दोघांना संधी मिळणार असल्याचा मोठा दावा केला.


राज्यात सत्तासंघर्षाच्या निकालानुसार शिंदे-फडणवीस सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकदाच झाला. त्यामुळे पहिल्या विस्तारामध्ये स्थान न मिळालेल्या अनेकांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. अनेकांना मंत्रिपदाची आस आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.


याआधी बच्चू कडू यांनीही माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली होती. २० व २१ तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला होता.


पुढे संजय शिरसाट यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झाला हा भाजपचा दावा बरोबर आहे. आम्हीसुद्धा शिवसेना भाजपचे सरकार येईल, या आनंदात होतो, पण अचानक बदल झाल्याने आपण भाजप सोबत जाणार नाही, असं कळले. मग त्यावेळी भाजपने जी खेळी केली, ती योग्य होती.


संजय राऊतांना इतरांच्या आनंदात आनंद साजरा करण्यात इंटरेस्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हे दिवस आले आहेत. उद्धव ठाकरे यांना इतकं लाचार संजय राऊत यांनी केलीय त्याची आम्हाला लाज वाटतेय, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका केली. त्याचबरोबर कर्नाटकच्या निकालाचा काहीही परिणाम दुसऱ्या राज्यावर होणार नाही, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत