भाजपनं केला निकाल मान्य; बहुमत मिळालं नाही तरी भाजप हार मानणार नाही असा दावा

निकालाचे विश्लेषण करू अन् लोकसभेत कमबॅक करू - बोम्मई


बंगळुरू : गेले अनेक दिवस सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत १३४ जागा मिळवत काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपने आतापर्यंत ६४ तर जेडीएसने २२ जागांवर विजय मिळवला आहे.

दक्षिण बेळगावचा निकाल जाहीर झाला असून येथे भाजपचे अभय पाटील विजयी झाले आहेत. बेळगाव उत्तर भागात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे रवी पाटील आघाडीवर होते. बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र, भाजपचे बी. वाय विजयेंद्र 'शिकारीपुरा' विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

"कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधानापासून भाजपा कार्यकत्यांपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली. आम्हाला बहुमत मिळाले नाही. अंतिम निकाल आल्यानंतर आम्ही त्याचे विश्लेषण करू आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत कमबॅक करू", असा विश्वास कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.