आपल्या १४-१५ आमदारांना राजीनामा द्यायला सांगा

Share

डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या १४-१५ आमदारांना उद्याच्या उद्या राजीनामा देण्यास सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कालपासून उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या गटाचे खासदार संजय राऊत नैतिकतेची भाषा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढली होती. त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपची मतेही पडली होती. त्यामुळे नैतिकता दाखवायची असेल, तर भाजपच्या मतांच्या मदतीने निवडून आलेल्या या चौदा-पंधरा आमदारांनी आपल्या पदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मग नैतिकतेच्या गोष्टी लोकांना सांगाव्या, असेही खासदार शिंदे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने मांडलेल्या आठ विविध याचिकांपैकी सहा याचिका फेटाळलेल्या आहेत. राजकीय पक्ष निश्चित करण्यासाठी तसेच अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांकडे असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चवताळलेल्या ठाकरे गटाने आता अध्यक्ष घटनाबाह्य आहेत, अशी भाषा बोलायला सुरुवात केली आहे. आपल्यासोबत असलेले आमदार आणि तसेच कार्यकर्ते टिकवण्यासाठी, त्यांची दिशाभूल करण्यासाठी आता यांनीही आवई उठवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे सरकार घटनाबाह्य नसून कायदेशीर आहे असेही स्पष्ट केलेले आहे. याआधी हे सरकार तीन महिन्यांत कोसळेल, असे सांगत कार्यकर्त्यांना थोपवून धरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला होता. ते आता साध्य होत नाही, हे सरकार टिकणार आहे हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारून आपली बाजू कशी योग्य होती, हे सांगण्याचा प्रयत्न चालवला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

Recent Posts

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

36 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

52 minutes ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

8 hours ago