लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा कट उद्ध्वस्त

  206

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटना आयएसआय यांच्या एका मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.



नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १० मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे.



यासोबतच त्यांना पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाबमधील बजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.



तसेच, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांनी आपल्या म्होरक्याचा विश्वास मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या देखील केली होती. दोघांनी दिल्लीतील एका तरुणाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हीडिओ त्या दोघांनी त्यांच्या म्होरक्यांना पाठवला. त्यानंतर म्होरक्याचा विश्वास त्या दोघांवर बसला. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )