लाल किल्ल्यावरील हल्ल्याचा कट उद्ध्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटना आयएसआय यांच्या एका मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.



नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १० मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे.



यासोबतच त्यांना पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाबमधील बजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.



तसेच, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांनी आपल्या म्होरक्याचा विश्वास मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या देखील केली होती. दोघांनी दिल्लीतील एका तरुणाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हीडिओ त्या दोघांनी त्यांच्या म्होरक्यांना पाठवला. त्यानंतर म्होरक्याचा विश्वास त्या दोघांवर बसला. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान