दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

ख्रिस जॉर्डनला संघात स्थान


मुंबई (वृत्तसंस्था) : दुखापतीचा ससेमीरा मुंबईची पाठ सोडताना दिसत नाही. प्ले ऑफ प्रवेशाची शर्यत अधिक तीव्र झालेली असताना दुखापतीमुळे मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आयपीएलच्या उर्वरित हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डनला संघात स्थान मिळाले आहे.


मुंबई इंडियन्सने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. "ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीचा सामना करत असून त्याला विश्रांतीची गरज आहे. म्हणून त्याच्या जागी जॉर्डनला संधी देण्यात आली आहे. जॉर्डनला आर्चरची रिप्लेस म्हणून मुंबईने घेतले आहे. आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे लक्ष ठेवले जात आहे. जोफ्रा आपल्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मायदेशी परतणार आहे", असे मुंबई इंडियन्सने स्पष्ट केले.


दुखापतीमुळे अनेक खेळाडू यंदाच्या हंगामाला मुकले आहेत. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामातील काही सामने खेळलेला नाही. तसेच ज्या सामन्यांत तो खेळला त्या सामन्यांत त्याला विशेष कामगिरी करता आलेली नाही.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक