वडेट्टीवार विरुद्ध पटोले त्यात भुजबळांची फोडणी, महाविकास खरंच मजबूत?

  115

महाविकास आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर


मुंबई: महाविकास आघाडीमधील धूसफूस वारंवार चव्हाट्यावर येत असतानाच आता काँग्रेसमध्येच विजय वडेट्टीवार विरुद्ध नाना पटोले हा कलगीतूरा पाहायला मिळत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनीही फोडणी घातली आहे. कहानी मी ट्वीस्ट म्हणजे यावेळी भुजबळांचे लक्ष्य संजय राऊत नसून पृथ्वीराज चव्हाण आहेत.


आमच्या सगळ्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला. त्यावर वडेट्टीवारांचा बंद खोलीत निर्णय करू म्हणत नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.


तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधत छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीत मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी शरद पवारांचा राजीनामा ते अजित पवारांची नाराजी यावर आतापर्यंत वारंवार भाष्य केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनीही आज संजय राऊतांना फटकारले. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केले.


ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडीची सत्ता का गेली. जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये कोणी मिठाचे खडे टाकू नयेत, असा टोला त्यांनी चव्हाणांना हाणला.


पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचं म्हणाले होते.
Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर