नाशिक आरटीओ कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन

  192

आकृतिबंध प्रलंबित, पदोन्नत्ती रखडली


पंचवटी (प्रतिनिधी): राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी (ता. ८) रोजी सकाळ सत्रात दोन तास काम आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले. परिणामी आरटीओ कार्यालयातील कामकाज दोन तास ठप्प झाले होते.


शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतिबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आकृतिबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास २०१६ मध्ये सादर केला होता. आकृतिबंध मंजुरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झाला. शासन निर्णय प्रसिद् होऊन सहा महिन्याहून अधिक काळ होऊनही आकृतिबंध कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे कर्मचारी नाराजी आहेत.


विभागातील पदोन्नतीचे सत्र नाहक प्रलंबित ठेवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून सेवाविषयक उन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे. तसेच मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार आकृतीबंधाची तात्काळ अंमलबजावणी करणे, कळसकर समितीच्या अहवालानुसार कामकाज वाटप करणे, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती पदोन्नत्या वर्ग दोन सह लवकरात लवकर करणे या मागण्यासाठी राज्यस्तरीय दोन तास लेखणी बंद करून निदर्शने करण्यात आली. वर्ग-२ ची पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळेही कर्मचारी वर्गात संताप आहे. शासन / प्रशासनाने मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा तीव्र संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही " मोटार वाहन विभाग (आरटीओ) नाशिक कार्यालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर यांनी दिला.


भरत चौधरी, पंढरीनाथ आडके, योगेश आहेरराव, दिनेश झोपे, निलेश गवळी, तारकेश्वर भामरे, संतोष चव्हाण, विलास नागरे, शिरीन शहा, रूपाली ठाकरे यांचा निदर्शनात सहभाग होता.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या