गुन्हा मोटरसायकलस्वाराचा, चलन कारचालकास

  116

तलासरी : वाहन चालकाने वाहतुकीचे नियम तोडल्यास त्यास दंडात्मक कारवाई केली जाते, वाहनचालक पळून गेल्यास त्याचा नंबर घेऊन त्याला दंडाचे चलन पाठविले जाते, पण या वाहतूक पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे नियम तोडून पळून गेलेल्या वाहन चालकाचे दंडाचे चलन दुसऱ्याच वाहन चालकाला पाठविले जात असल्याने वाहतूक पोलिसांचा अजब कारभार उघड होऊ लागल्याने वाहनचालक त्रस्त असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.


रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या महामार्ग ट्रॅफिक पोलीस हे रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्याऐवजी वाहन चालकांची कशी लूट व पिळवणूक करतात हे सर्वसामान्य जनता बघत असताना, आता त्याचा बेजबाबदारपणाचा फटका निर्दोष वाहन चालकांना बसू लागला आहे.


एक मोटारसायकल चालक विनाहेल्मेट पोलिसांच्या नियमांचा भंग करून पळून गेला, पण यावेळी कर्तव्य बजावित असलेल्या अधिकारी पोलीस कर्मचाऱ्याने त्या गाडीचा फोटो काढून चलन पाठविले, परंतु चलन पाठवितांना त्या जबाबदार कर्मचाऱ्याने रुपये १२५० चे चलन कारला पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडविले.


तसेच तलासरीमधील पत्रकार सुरेश काटे यांच्या कीया करेन्स कारला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांचे चलन क्रमांक दि. ११ फेब्रुवारी २०२३ चे अधिकारी बबन नांदुरकर यांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणेबाबत रुपये ७५०, तसेच इतर दोन वाहनचालकांनी विनाहेल्मेट गाडी चालविलेबाबत रुपये ५०० असे एकूण १२५० रुपयाचे चलन आल्याने याबाबत संशय आल्याने ईव्हिडन्स पाहिले असता, फोटो हे दुसऱ्यांच्या मोटारसायकल असल्याचे आढळून आले़ याबाबत ऑनलाइन तक्रार टाकण्यात येणार असली, तरी ट्रॅफिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा मात्र मन:स्ताप झाला आहे.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत

४० हजार पशुधनासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा

जून महिन्यातही पाणीटंचाई कायम पालघर : जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील पाणीटंचाई जून

नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी