भुजबळांचा राऊतांवर हल्लाबोल

नाशिक : 'सामना' वृत्तपत्रात आज छापून आलेल्या अग्रलेखावर छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे वाटते का, असा खडा सवाल त्यांनी केला आहे. तुमचं जेवढं काही आयुष्य असेल तेवढं शरद पवार यांचं राजकारण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला, तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला. अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादी आणि पवारांवर करण्यात आली आहे.

यावर छगन भुजबळ म्हणाले, "आता संपादक म्हणजे संजय राऊतच हे सर्व लिहित आहेत हे आम्हांला माहित आहे. त्यांना हे सगळे उकळून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असं त्यांना वाटतं का?"

"संजय राऊत हे कोणाकोणाच्या घरात गेले होते, आणि कोणाकोणाच्या बॅगा तपासल्या हे त्यांनाच माहित. एवढं लक्ष त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बॅगांवर ठेवलं असतं तर आज बाहेर बसण्याची परिस्थिती आली नसती", अशी सडेतोड टीका भुजबळांनी केली आहे.
Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,