बँक ऑफ इंडियाला १३५० कोटींचा निव्वळ नफा

रजनीश कर्नाटक यांची माहिती


मुंबई : आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाला २०२२-२३ या आथिर्क वर्षात १३५० कोटींचा निव्वळ नफा झाला असून १२३ टक्क्याने त्यात वाढ झाली असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, बँकेच्या वैश्विक व्यवसायात ९.२७ टक्क्याने वाढ झाली असून मार्च २०२२ मध्ये १०,८४,९१० कोटी इतका हा व्यवसाय होता. तो मार्च २०२३ मध्ये ११,८५,४३८ कोटी झाला आहे.


बँक ऑफ इंडियाचा संचालनात्मक नफा मागील वर्षाच्या तुलनेत ६९.६७ टक्के वाढला, आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत संचालनात्मक नफा २४६६ कोटी रुपये होता. जो आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ४१८४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आहे. तर बँकेचे निव्वळ व्याजाच्या माध्यमातून उत्पन्न ३७.७७ टक्क्याने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ते ३,९८७ कोटी रुपये इतके होते. आता ते २०२३ चा चौथ्या तिमाहीत ५,४९३ कोटी रुपये झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते आणखी म्हणाले, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना क्रेडिट मागील वर्षीच्या तुलनेत ९.३१ टक्क्यांनी वाढले आणि मार्च २३ मध्ये ७०,७७७ कोटी रुपये झाले. सकल एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत १७.३६ टक्क्याने कमी झाला,मार्च २२ मध्ये ४५६०५ कोटी रुपये होता. मार्च २३ मध्ये ३७६८६ कोटी रुपये झाल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, लवकरच रितेशचा 'हा' आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर

बादशाहनंतर आता 'या' प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी

नुकताच काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक बादशाहला बिष्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु