बँक ऑफ इंडियाला १३५० कोटींचा निव्वळ नफा

Share

रजनीश कर्नाटक यांची माहिती

मुंबई : आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाला २०२२-२३ या आथिर्क वर्षात १३५० कोटींचा निव्वळ नफा झाला असून १२३ टक्क्याने त्यात वाढ झाली असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, बँकेच्या वैश्विक व्यवसायात ९.२७ टक्क्याने वाढ झाली असून मार्च २०२२ मध्ये १०,८४,९१० कोटी इतका हा व्यवसाय होता. तो मार्च २०२३ मध्ये ११,८५,४३८ कोटी झाला आहे.

बँक ऑफ इंडियाचा संचालनात्मक नफा मागील वर्षाच्या तुलनेत ६९.६७ टक्के वाढला, आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत संचालनात्मक नफा २४६६ कोटी रुपये होता. जो आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ४१८४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आहे. तर बँकेचे निव्वळ व्याजाच्या माध्यमातून उत्पन्न ३७.७७ टक्क्याने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ते ३,९८७ कोटी रुपये इतके होते. आता ते २०२३ चा चौथ्या तिमाहीत ५,४९३ कोटी रुपये झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते आणखी म्हणाले, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना क्रेडिट मागील वर्षीच्या तुलनेत ९.३१ टक्क्यांनी वाढले आणि मार्च २३ मध्ये ७०,७७७ कोटी रुपये झाले. सकल एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत १७.३६ टक्क्याने कमी झाला,मार्च २२ मध्ये ४५६०५ कोटी रुपये होता. मार्च २३ मध्ये ३७६८६ कोटी रुपये झाल्याचे ते म्हणाले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

56 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago