अवकाळी पावसानंतर आता 'मोचा'चे संकट

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत असतानाच आजपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रुपांतर होऊ शकते. एक ते दोन दिवसात ते अधिक धोकादायक बनण्याची शक्यता आहे. येमेनमधील एका शहराच्या नावावरुन या देशाने या वादळाला 'मोचा' असे नाव दिले आहे.



'मोचा' चक्रीवादळ भारताच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागातून, ओडिशा आणि आग्नेय गंगेच्या पश्चिम बंगालमधून पुढे जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पुढील ४ दिवस हवामान खराब राहू शकते.



७ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि लगतच्या भागात ४० ते ६० किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात. ८ मे रात्री वाऱ्याचा वेग ७० किमी ताशी आणि १० मे पासून ८० किमी ताशी इतका वाढू शकतो.



मच्छिमारांना पुढील ४ दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. 'मोचा' वादळाचा ७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रभाव दिसून येईल. ८ आणि ९ मे रोजी त्याची तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू