अवकाळी पावसानंतर आता 'मोचा'चे संकट

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत असतानाच आजपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रुपांतर होऊ शकते. एक ते दोन दिवसात ते अधिक धोकादायक बनण्याची शक्यता आहे. येमेनमधील एका शहराच्या नावावरुन या देशाने या वादळाला 'मोचा' असे नाव दिले आहे.



'मोचा' चक्रीवादळ भारताच्या दक्षिण किनारपट्टीच्या भागातून, ओडिशा आणि आग्नेय गंगेच्या पश्चिम बंगालमधून पुढे जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पुढील ४ दिवस हवामान खराब राहू शकते.



७ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय आणि लगतच्या भागात ४० ते ६० किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात. ८ मे रात्री वाऱ्याचा वेग ७० किमी ताशी आणि १० मे पासून ८० किमी ताशी इतका वाढू शकतो.



मच्छिमारांना पुढील ४ दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. 'मोचा' वादळाचा ७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रभाव दिसून येईल. ८ आणि ९ मे रोजी त्याची तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन