‘ऑपरेशन कावेरी’चा विजय; सुरक्षेचा गंभीर प्रश्न सुटला!

नवी दिल्ली : भयंकर रक्तपात सुरू असलेल्या सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन कावेरी’ ही मोहीम राबविण्यात आली होती. याअंतर्गत वायुसेनेच्या १७ विमानांनी आणि भारतीय नौसेनेच्या ५ जहाजांनी ३ हजार ८६२ भारतीयांना मायभूमीत सुखरुप परत आणले आहे.

भारतीय वायुसेनेचे के. सी १३० हे विमान शुक्रवारी भारतीयांना घेऊन परत आले. त्याचबरोबर भारताच्या 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमधून ३ हजार ८६२ नागरिकांना सुखरुप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना दिली.

भारतीय वायुसेनेची विमाने सौदीच्या जेद्दाह शहरात, तर नौदलाची विनाशिका सुदानच्या बंदरात दाखल करुन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. २४ एप्रिल रोजी सुरु झालेली ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान ४७ प्रवाशांना घेऊन शुक्रवारी ५ मे रोजी मायभूमीत परतले आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांत तीन हजारहून अधिक भारतीयांना सुखरुप आणण्यात भारत यशस्वी झाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे सातत्याने या मोहिमेवर लक्ष ठेवून होते.

ऑपरेशन कावेरीबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, "ऑपरेशन कावेरीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांच्या धैर्याचे कौतुक आहे. खार्तूम येथील भारताच्या दूतावासाने या कठीण काळात चांगले सहकार्य केले आहे. सौदी अरेबियात तैनात टीम इंडिया आणि भारताशी समन्वय साधणाऱ्या MEA रॅपिड रिस्पॉन्स सेलचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात सर्व भारतीयांच्या घेतलेली सुरक्षेची जबाबदारी आणि त्याची वचनबद्धता हीच आमची प्रेरणा असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या १७ विमानांनी सूदान मधून उड्डाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळापर्यंत भारतीयांना सुखरुप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. सुदानच्या सीमेवर असणाऱ्या देशातून जवळपास ८६ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. तसेच जे भारतीय नागरिक सुखरुप सौदी अरेबियामध्ये पोहचले त्यांना आवश्यक ती मदत केल्यामुळे भारताने सौदी अरेबियाचे देखील आभार मानले आहेत.

भारताने फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, संयुक्त अरब या देशांचे देखील आभार मानले आहेत. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे बचाव कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सौदी अरेबियात उपस्थित होते. याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मुरलीधरन यांचेही कौतुक केले.
Comments
Add Comment

Manipur : मणिपूरमध्ये उसळला हिंसाचार, महिलेसह तिघांची हत्या

कांगपोकपी : मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील सैतु-गाम्फाजोल उपमंडळातील लोइबोल खुल्लेन गावात शुक्रवार ५ जून

Monsoon 2026 : आनंदाची बातमी, मान्सून गोव्यात पोहोचला

लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकणार पणजी : मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून सध्या

धक्कादायक! पंजाबमध्ये खासगी कंपनीत महिला कर्मचाऱ्याची सहकाऱ्याकडून हत्या; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाब: पंजाबमधील मोहाली (Mohali crime) येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेची

PMMVY : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गरोदर महिलांना मिळणार ११,००० रुपयांपर्यंतचा लाभ; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत

NEW DELHI : केंद्र सरकारकडून गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी ‘प्रधानमंत्री मातृ वंदना

Noida Massive Fire : नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; रहिवाशांमध्ये घबराट

नोएडा : नोएडातील सेक्टर ७५ परिसरातील आयव्ही काउंटी या निवासी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग (Massive Fire)

Petrol Diesel Price Today : क्रूड ऑइल झाले स्वस्त, पण इंधन महागच! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेल दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑइल (Crude Oil) च्या किमतीत घसरण झाली असली, तरी