बडोदा - जेएनपीटी महामार्गामुळे बदलापूरमध्ये येणार ‘समृद्धी’

  237

बेंडशीळजवळ महामार्गासाठी साडेचार किमीचा बोगदा



बदलापूर (वार्ताहर): बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात प्रगतिपथावर आहे. हा महामार्ग बदलापूरमधून जात असून त्यामुळे भविष्यात बदलापूरला थेट पनवेल आणि जेएनपीटी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. सोबतच बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार असून पर्यायाने उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही येणार आहेत. त्यामुळे या महामार्गासोबतच ‘समृद्धी’ची दारे उघडली जाणार आहेत. या महामार्गामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा फायदा होणार असून डोंबिवली, कल्याणनंतर बदलापूरमध्ये जागेचे आणि घरांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.



बडोदा ते जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या महाराष्ट्रात जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत हा महामार्ग असेल. महाराष्ट्रात १८९ किमी लांब आणि १२० मीटर रुंद असा हा आठ पदरी महामार्ग असेल. हा रस्ता अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराजवळून जात असून त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात बडोदा आणि जेएनपीटीची थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. सोबतच बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम बेंडशीळ गावाजवळ सुरू करण्यात आले आहे. तब्बल साडेचार किमी लांबीचा हा बोगदा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार जानेवारी २०२५ पर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, तर जून २०२५ पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होऊन रास्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत

Share Market Morning News: बाजार सुसाट सकाळीच सेन्सेक्स ३२२.८४ व निफ्टी १०९.३५ अंशाने वधारला

प्रतिनिधी: आज इक्विटी बेंचमार्क सकाळच्या सत्रात बाजाराने जबरदस्त सुरूवात केली आहे. आरबीआयने रेपो दरात कपात

गणेश विसर्जनासाठी आता आखणार चिन्हांकित रेखा

मुंबईतील समुद्रात पालिका बसवणार दिशानिर्देशक सौर दिवे मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण

ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील

Health: दररोज सकाळी खा एक वाटी पपई, महिनाभरात शरीरात दिसतील हे बदल

मुंबई: पपई केवळ एक स्वादिष्ट फळच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हे शरीरास अनेक प्रकारचे फायदे देते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन