महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळजवळ निश्चित झाली असून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात देखिल विविध भाकिते वर्तवली जात असून चर्चेला उधाण आले आहे.


पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ दोन तारखाच उरल्या आहेत.


ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ आहे. त्यापैकी एक न्यायमूर्ती एम. आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. त्याआधी १३ मे शनिवार आणि १४ मे रोजी रविवार आहे.


त्यात आणखी एक महत्वाचे असे की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. परंतु सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. तेथे १० मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतरच येण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर मग ११ आणि १२ मे या दोन तारखा सर्वाधिक महत्वाच्या ठरतात. त्यामुळे ११ किंवा १२ याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.

Comments
Add Comment

या दिवाळीत प्रियजनांना भेट द्या फास्टटॅगचा वार्षिक पास

नवी दिल्ली : प्रवासाची उत्तम सोय आणि आराम देणारा, फास्टटॅगचा वार्षिक पास या सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी एक

Bihar elections: पंतप्रधान घेणार १० जाहीर सभा तर अमित शहा २५ सभा घेणार

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या १० जाहीर सभा प्रस्तावित आहेत.

'या' महिलांना पोटगी मिळणार नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : घटस्फोट प्रकरणात पोटगी हा महत्वाचा मुद्दा असतो. वैवाहिक भांडणे न्यायालयात सादर झाल्यावर पोटगी वरून

आगळीक कराल तर याद राखा; पाकिस्तानची इंच न् इंच जमीन 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा लखनऊमध्ये 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी तयार;

सणासुदीच्या बाजारात ७ लाख कोटींची ऐतिहासिक खरेदी; मोदींच्या जीएसटी कपातीचा 'जादुई' प्रभाव!

महागाई ८ वर्षांच्या नीचांकी पातळीवर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी दर कपातीच्या

मालगाडीतून तब्बल २ कोटींचे प्रतिबंधित कफ सिरप जप्त! सरकारी रेल्वे पोलिस दल आणि सीमाशुल्क विभाग यांची संयुक्त कारवाई

त्रिपुरा : देशभरात सध्या हानीकारक खोकल्याच्या औषधांचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. विषारी खोकल्याच्या औषधाच्या