पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाने पछाडलेल्या नराधमाने मुलांसमोर केला घृणास्पद प्रकार; वाचून येतील अंगावर शहारे...

  115

पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्यांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. ३० एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकारात ४० वर्षीय पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हिटरचे चटके दिले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय क्रूरपणे पत्नीला बांधून ठेवत पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंधदेखील ठेवले. पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.


सदर घटनेतील महिला आपल्या १६ वर्षीय मुलीचा मोबाईल पाहत होत्या. पत्नीच्या हातात मोबाईल पाहून ती कोणाशी तरी बोलतेय असा संशय घेत पतीने तिला फरफटत बेडरुममध्ये नेले व कडी लावली. या जोडप्याची चारही मुले त्यावेळी घरातच होती. या प्रकाराने सगळी मुले घाबरली.


या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीच्या सलवार व ओढणीने तिचे हातपाय बेडला बांधत गुप्तांगावर हिटरने चटके दिले. एवढ्याच क्रूरतेवर न थांबता पत्नीच्या तोंडात स्वतःचा पाय घालत तिच्या अंगावर लघुशंका केली.


दरम्यान, मुलं घाबरुन बाहेर आरडाओरडा करु लागल्याने आरोपीने बेडरुमचा दरवाजा उघडला आणि मुलांसमोरही आपले घाणेरडे कृत्य चालूच ठेवले. महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक केली आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या