बावनकुळे यांची जम्बो टीम सज्ज; भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज घोषणा होणार!

ठाकरे नावाची नाटक कंपनी, ते नौटंकी करताहेत - चंद्रशेखर बावनकुळे


मुंबई : भाजपची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी तब्बल बाराशे सदस्यांची जम्बो टीम राहील. या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार असल्याचे तसेच ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी पुनरुच्चारही यावेळी केला.


नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित


दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. टीम तयार करण्यासाठी त्यांना ९ महिने लागले आणि विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तितकाच कालावधी बाकी आहे. नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम राहणार आहे.


आज राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक जाहीर केले जाणार आहे. तर नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला.


ठाकरे नावाची नाटक कंपनी, ते नौटंकी करताहेत...


यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, बावनकुळे यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे केव्हा भूईसपाट होतील, कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. आधी ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.


तुमच्या भोंग्याला सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा...


तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर देताच त्यांचा अवमानकारक उल्लेख केला जातो. संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरे यांना पुन्हा दिले.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार