बावनकुळे यांची जम्बो टीम सज्ज; भाजपच्या नव्या कार्यकारिणीची आज घोषणा होणार!

ठाकरे नावाची नाटक कंपनी, ते नौटंकी करताहेत - चंद्रशेखर बावनकुळे


मुंबई : भाजपची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी तब्बल बाराशे सदस्यांची जम्बो टीम राहील. या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार असल्याचे तसेच ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी पुनरुच्चारही यावेळी केला.


नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित


दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. टीम तयार करण्यासाठी त्यांना ९ महिने लागले आणि विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तितकाच कालावधी बाकी आहे. नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम राहणार आहे.


आज राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक जाहीर केले जाणार आहे. तर नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला.


ठाकरे नावाची नाटक कंपनी, ते नौटंकी करताहेत...


यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, बावनकुळे यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे केव्हा भूईसपाट होतील, कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. आधी ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.


तुमच्या भोंग्याला सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा...


तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर देताच त्यांचा अवमानकारक उल्लेख केला जातो. संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरे यांना पुन्हा दिले.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद