राष्ट्रवादीचे ठरले! सुप्रिया सुळे होणार राष्ट्रीय अध्यक्ष!

१५ दिवसांपूर्वीच झाला होता निर्णय, भुजबळांनीही दिले संकेत


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेच यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.


सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे. दस्तुरखूद्द सुप्रिया सुळे यांनीच १५ दिवसांत दोन स्फोट होतील असे संकेत दिले होते. त्याचवेळी अजित पवार यांचे कथित नाराजी नाट्य सुरू होते. त्यावेळीच पक्षाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे.


सुळे यांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव आधीच झाली होती. लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतच यावर शिक्कामोर्तब केले जाण्याचीही शक्यता आहे.


दरम्यान, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष होण्यास काहीच अडचण नाही. कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशी विभागणी झाली आहे. त्यांचे लोकसभेत काम आहे. त्यामुळे त्या अध्यक्ष होण्यात काहीच अडचण नाही, असे भुजबळ म्हणाले.


दरम्यान, राष्ट्रवादीच्या २६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. तर शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या बैठकीत पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना