शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर वज्रमुठ सभेबद्दल नाना पटोले यांचं खळबळजनक विधान

भाजप आमदार नितेश राणे यांचे भाकीत खरे ठरले!


मुंबई: महामहाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचे भवितव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर धोक्यात आले आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुढे वज्रमुठ सभा होणार नाही असे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबतचे भविष्य आधीच वर्तवले होते. १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची होणारी सभा ही शेवटची वज्रमुठ सभा असेल असे भाकीत नितेश राणे यांनी केले होते.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील वज्रमुठ सभेबाबत बोलताना सांगितले की वज्रमुठ सभेचा निर्णय एकत्रित बैठक घेऊन घेतला जाईल असं म्हटलं आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल. पुण्यातील वज्रमुठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे विधान नाना पटोले यांनी केलं. नानांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत. एकीकडे पवारांचा राजीनामा आणि दुसरीकडे पुण्यातील सभेबाबत नानाचं हे विधान आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलं आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबईनंतर आता पुण्यात याच महिन्यात ही वज्रमुठ सभा होत आहे. या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या सभेसाठी शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने पुणे शहरातील नेत्यांची बैठक पार पडली. तर, पुढेही बैठका होणार आहेत. मात्र, तत्पूर्वीच नाना पटोले यांनी पावसाचं कारण देत सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


दरम्यान, भाजप खासदार सुजय विखे पाटील महाविकास आघाडीची वज्रमुठ म्हणजे समुद्रातील वाळू घट्ट धरल्यानंतर जशी हातातून निसटते तसा प्रकार आहे, असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच निम्मा कार्यक्रम केला आहे, असेही म्हणत यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभांवर टीका केलीय.

Comments
Add Comment

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.