शरद पवार फेरविचार करणार! दोन-तीन दिवसात घेणार निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले. कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सिल्वर ओक येथे सकाळपासून ठाण मांडून बसले होते. राजीनामा त्वरीत मागे घेण्यासाठी कार्यकर्ते हट्टाला पेटले असले तरी तातडीने आपला निर्णय जाहीर न करता दोन-तीन दिवसात या निर्णयावर पवारसाहेब फेरविचार करतील, असे अजित पवार यांनी सांगितले.


'आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.' असा निरोप पवारांनी धाडल्याचे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.


कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे, राज्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असेही पवारांनी सांगितले आहे.


त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणे धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असेही अजित पवारांनी सांगितले.


अजित पवार म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केले होते. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत. आता पवारसाहेबांना विचार करायला वेळ द्या. तुम्हीही काहितरी खाभन घ्या. पवार साहेबांना आपला कार्यकर्ता उपाशीपोटी राहिल्याचे आवडणार नाही, तेव्हा सर्वांनी दोन-तीन दिवस वाट पहा, जे सर्वांच्या मनात आहे, तेच सर्वांच्या मनासारखे होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर