काँग्रेससमोर मुजरा करणा-यांना हिजड्यांचा प्रमुख म्हणायचे का?

भाजप आमदार नितेश राणे यांचा थेट झोंबणारा सवाल!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांचे भाषण ट्विट केले असता त्याला उत्तर म्हणून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवले. जाहीर सभेत बोलताना काँग्रेसमोर झुकणारे हिजडे आहेत, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. यावर नितेश राणे म्हणाले की, आता काँग्रेसमोर कोण झुकतेय, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. उद्धव ठाकरे यांना आता बाळासाहेबांच्या भाषेत ठाकरे सेनाप्रमुख म्हणायचे की हिजड्यांचा प्रमुख म्हणायचे का? असा झोंबणारा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे.


लाव रे तो व्हिडिओ म्हणत नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हिजडा असे बाळासाहेबांनी म्हटले होते. मी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नेमका हाच दुवा पकडत, पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.


नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर झाले आहे. राजकीय लव्ह जिहाद झाला आहे. २०१९ ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकले, अशा शब्दात नितेश राणेंनी खालच्या भाषेत टीका केली आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच