अजिंठा, वेरुळ लेणीतील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

  163

परफ्यूम, लाल‎ रंगाचे कपडे, गुटखा, सिगारेटचा धूराची मधमाशांना अॅलर्जी


छत्रपती संभाजीनगर‎ : अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना मधमाशांच्या पोळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन भारतीय पुरातत्त्व विभागाने केले आहे. तेथे जाताना उग्र वासाचे परफ्यूम, लाल‎ रंगाचे कपडे टाळण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. कारण त्यामुळे लेणींच्या‎ परिसरातील मधमाशा हल्ला करण्याची‎ शक्यता जास्त आहे.


काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणीत मधमाशांनी २०‎ पर्यटक व ६ कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्याआधी ९ एप्रिल रोजी वेरूळ येथे १६ क्रमांकाची कैलास लेणी पाहताना १६ पर्यटकांवर आग्यामोहोळाच्या माशांनी हल्ला केला होता. दहा वर्षांपूर्वी लेणी क्रमांक २९ व १६ मध्ये मधमाशांनी केलेल्या‎ हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते.‎ त्यापूर्वी २००७ मध्येही आग्यामोहोळाने पर्यटकांवर‎ हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती.‎


वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणीत मोठ्या‎ प्रमाणात मोहोळ आहेत. या मधमाशांना आपली पोळी थंड ठेवण्यासाठी थंड हवेची गरज असते. सध्या वाढलेली उष्णता त्यांना सहन होणारी नाही. त्यात मिथिलिन क्लोराइड, फेरॉन यांचा वापर केलेले उग्र गंधाचे परफ्यूम आणि लाल रंगामुळे मधमाशा चिडतात. ३४° सेल्सिअसपेक्षा तापमान अधिक झाल्यास परफ्यूमचा वास अधिक उग्र होतो आणि माशा आक्रमक होतात. मानवांची श्वासनलिका मोठी असल्याने त्यांना हा वास सहन होणारा असला तरी तो मधमाशांना सहन होत नाही. गुटखा, सिगारेटचा धूर याचाही त्यांना राग येतो. त्यांना लाल रंगाचाही राग असल्याने त्या हल्ला चढवतात. त्यामुळे पर्यटनादरम्यान या सर्व गोष्टी टाळाव्यात असे तज्ज्ञांचे मत आहे.


हे हल्ले टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुटीच्या दिवशी धूर करून‎ लेणीतले मोहोळ‎ हटवण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु मधमाशा काही काळासाठी उठून दुसर्‍या ठिकाणी जाऊन बसतात त्यामुळे मोहोळ पूर्णपणे हटवणे कठीण होते. त्यामुळे सुटीच्या दिवशी दोन्ही लेण्यांमध्ये धूर करुन मोहोळ हटवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati Atharvashirsha : दगडूशेठ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण; खासदार सुनेत्रा पवारांचीदेखील खास उपस्थिती

पुणे : गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यात भक्तिभाव आणि मंत्रोच्चारांच्या गजरात झाली. शहरातील

गडचिरोली जिल्ह्यात चकमक, एवढे जहाल नक्षलवादी ठार

गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : “शिवनेरीवरून शब्द देतो...” मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा!

पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीतून २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया