Categories: रायगड

नागरिकांच्या घरात धुळीचे साम्राज्य, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिक हैराण

Share

मुरुड(प्रतिनिधी) : मुरुड नगर परिषदेच्या नव्याने तयार करण्यात येणाऱ्या नाल्यांच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड पसरल्याने बाजारपेठ रस्त्यावर धुळवड होत आहे. या कामी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खडी व मातीमुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या कामी नगर परिषद अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मुरुड शहरातील विकासकामांचा धूमधडाका जोरात सुरू आहे, पण या कामात ठेकेदार बेजबाबदारपणे काम करीत असल्याने याचा त्रास नाहक नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारांची पाच फुटी खोली असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. गटारातील माती रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे. त्यातील खडी सर्वत्र पसरलेली आहे. या रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या वेगाने रस्त्यावरील माती घरात जात आहे. गाड्यांच्या टायर खालून रस्त्यावर पसरलेली खडी उडून घरात जात आहे. रस्त्यावर जात-येत असलेल्या नागरिकांच्या टायर खालून उडालेली खडी लागत आहे.

दुकानात धुळीचे लोट जात आहेत, त्यामुळे दुकानदारांच्या मालाचे नुकसान झाले आहे. तरी या बेजबाबदार ठेकेदाराला लगाम लावण्याची गरज आहे. या कामात ठेकेदाराने नागरिकांसाठी कोणत्याही स्वरूपाची सुरक्षाव्यवस्था केलेली नसल्याने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्यावर पडलेली खडी व माती साफ करावी व या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

1 hour ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

1 hour ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago