परशुराम घाट बंद असल्याने एसटीला दोन लाखांचा तोटा

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने, शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकातून दररोज खेड, दापोली व मुंबई, ठाणे, बोरिवली मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बाहेरून मुंबईला जाण्यासाठी या आगारात येणाऱ्या गाड्या पाच वाजेपर्यंत थांबवून सोडल्या जातात. या संपूर्ण काळात एसटी महामंडळाचा दोन लाखांपेक्षा जास्त तोटा होत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.



बहाद्दूरशेख नाका येथे वाहतूक कोंडी
मुंबई-गोवा महामार्गाचे परशुराम घाटातील काम सुरू असल्याने या मार्गावरील दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे. या दरम्यान कळंबस्ते, आंबडस, चिरणी मार्गे लोटे अशी, पर्यायी वाहतूक सुरू असली, तरी अवजड वाहतूक बंद असते. या मार्गावर पोलीस बंदोबस्त आहे, तो तुटपुंजा असाच आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर अनेकवेळा डंपर, ट्रक, खासगी बस धावतात; परंतु हा मार्ग अरुंद असल्याने अनेकवेळा जागोजागी वाहतुकीची कोंडी होते. शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या बहाद्दूरशेख नाका येथे वाहनांची मोठी रांग लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा लहान-मोठे अपघातही होतात. गुरुवारी दुपारी एक डंपर रस्त्यात बंद पडल्याने अशीच वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली होती. या मार्गावरील मोठी वाहने बंद ठेवावीत, अशी मागणी स्थानिक जनतेनेही केली आहे. कारण अरुंद रस्त्यामुळे ग्रामस्थांनाही याचा फटका बसतो.



सर्वात जास्त फटका एसटी बस वाहतुकीला बसला आहे. चिपळूण आगारातून दररोज खेड, दापोली, मंडणगड मार्गावर किमान ३० गाड्या धावतात. चिपळूण-खेड तर जास्त फेऱ्या आहेत. या सर्व फेऱ्या सध्या दुपारी बंद असतात. त्याचा आर्थिक भुर्दंड एसटी महामंडळाला भोगावा लागत आहे.



याशिवाय रत्नागिरी, राजापूर, देवरुख, गुहागर या सिंधुदुर्ग आगारातून मुंबई, ठाणे, बोरिवलीकडे जाणाऱ्या दुपारच्या १० ते १२ गाड्या चिपळूण आगारात पाच वाजेपर्यंत उभ्या केल्या जातात.



१० मेपर्यंत घाटाचे काम सुरू राहणार असून प्रवाशांची ससेहोलपट सुरूच राहणार आहे. पावसाळ्यात घाट बंद झाला, तर याहीपेक्षा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे मत माजी सभापती शौकत मुकादम यांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका

Anjanari Ghat Accident : आंजनारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; लोखंडी पत्र्यात अडकलेल्या चालकाची थरारक सुटका

रत्नागिरी : रत्नागिरीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) वरील आंजनारी घाटात (Anjanari Ghat) शुक्रवारी (३ जुलै)

Khed News : खेडमधील धक्कादायक घटना! धावत्या मांडवी एक्स्प्रेसमधून चिमुकल्यासह तिघांनी मारली उडी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मडगावहून मुंबईतील छत्रपती शिवाजी

Horrific bus accident : रत्नागिरीत दोन बसेसची समोरासमोर धडक; १५ विद्यार्थी जखमी

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिरजोळे-उक्षी मार्गावर गुरुवारी सकाळी दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह