वाड्यातील परळी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण

वाडा (प्रतिनिधी) : वाडा तालुक्यातील परळी या अति दुर्गम गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असून, मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी परळी येथील नदीवर बंधारा बांधण्यात आला होता. मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे त्या बंधाऱ्याला गळती लागली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गावातील महिलांना घरगुती वापराच्या पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे, तर काही ग्रामस्थ वर्गणी काढून टँकरने पाणी विकत आणत आहेत.


परळी येथील समाजिक कार्यकर्ते तारक जाधव यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधेरे यांना गुरुवारी २७ एप्रिल रोजी एक निवेदन दिले आहे. नवीन पाइपलाइनदेखील गंजलेल्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी पाइप गळती आहे. सदर ग्रामपंचायत परळीची नळ पाणीपुरवठा योजना नादुरुस्त असल्याने येथील महिलांना रात्रं-दिवस पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये महिलांसोबत पुरूष मंडळी, वयोवृद्ध नागरिक तसेच आबालवृद्धांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. मात्र याचे कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना नाही. त्यातच कडक उन्हामुळे येथील विहिरी व इतर जलस्त्रोत पुर्णपणे आटले असून, ज्या काही थोड्या फार विहिरी अस्तित्वात आहेत, त्यामध्ये पाणी नावापुरते शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाण्याअभावी येथील ग्रामस्थांना तसेच पशू-पक्षी, प्राण्यांना तडफडून मरण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परळी येथील नागरिकांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवली नाही, तर मंगळवार, दि. ०२ मे २०२३ रोजी वाडा तहसील कार्यालयावर महिला व आबालवृद्धांसह प्रचंड हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका