वाड्यातील परळी गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण

वाडा (प्रतिनिधी) : वाडा तालुक्यातील परळी या अति दुर्गम गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत असून, मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी परळी येथील नदीवर बंधारा बांधण्यात आला होता. मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामामुळे त्या बंधाऱ्याला गळती लागली असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गावातील महिलांना घरगुती वापराच्या पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे, तर काही ग्रामस्थ वर्गणी काढून टँकरने पाणी विकत आणत आहेत.


परळी येथील समाजिक कार्यकर्ते तारक जाधव यांनी वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधेरे यांना गुरुवारी २७ एप्रिल रोजी एक निवेदन दिले आहे. नवीन पाइपलाइनदेखील गंजलेल्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी पाइप गळती आहे. सदर ग्रामपंचायत परळीची नळ पाणीपुरवठा योजना नादुरुस्त असल्याने येथील महिलांना रात्रं-दिवस पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये महिलांसोबत पुरूष मंडळी, वयोवृद्ध नागरिक तसेच आबालवृद्धांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. मात्र याचे कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना नाही. त्यातच कडक उन्हामुळे येथील विहिरी व इतर जलस्त्रोत पुर्णपणे आटले असून, ज्या काही थोड्या फार विहिरी अस्तित्वात आहेत, त्यामध्ये पाणी नावापुरते शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाण्याअभावी येथील ग्रामस्थांना तसेच पशू-पक्षी, प्राण्यांना तडफडून मरण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत परळी येथील नागरिकांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवली नाही, तर मंगळवार, दि. ०२ मे २०२३ रोजी वाडा तहसील कार्यालयावर महिला व आबालवृद्धांसह प्रचंड हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार