भिवंडी : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक नागरीक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळ पाडा परिसरात ही घटना घडली.
स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून दुर्घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफची टीम, पोलीस पोहचले आहेत. त्यांनी मदत व बचावकार्य तातडीने सुरू केले आहे.
या इमारतीमध्ये सुमारे २५० लोक रहातात. मात्र त्यापैकी काही कामानिमित्त बाहेर गेले असावेत. तर या इमारतीच्या तळमजल्यावर एक गोदाम असून तेथे ३० ते ४० जण काम करतात. यापैकी कोणीही बाहेर पडताना दिसलेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…