नव्या शैक्षणिक वर्षात शाळांना ७६ दिवस सुट्टी

  320

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. या वर्षात शाळांना तब्बल ७६ दिवस सुट्टी मिळणार आहे. यात विविध सण व उत्सवाच्या तब्बल २७ दिवसांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. दरम्यान शाळांचे कामकाज २३८ दिवस सुरू
राहणार आहे.


दरवर्षी नवे शैक्षणिक वर्षाचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. प्रथम सत्र हे १५ जून २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ असे असणार आहे. त्यानंतर ८ ते २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत १० दिवसांची दिवाळी सुट्टी असणार आहे. द्वितीय सत्र २२ नोव्हेंबर २०२३ ते १ मे २०२४ पर्यंत असेल. उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून २०२४ अशी ३७ दिवस मिळणार आहे.


शाळांना उन्हाळ्याची व दिवाळीची सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यांसारख्या सणांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने सुट्टीचे समायोजन करता येणार आहे. शैक्षणिक वर्षात एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. शाळांचे कामाचे दिवस किमान २३० असलेच पाहिजेत. मुख्याध्यापकांच्या अखत्यारितील २ स्थानिक सुट्ट्या निश्चित करून त्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवाव्या लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्ट्या व शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या शाळांनी घेणे बंधनकारक आहे.


यंदाच्या शैक्षणिक वर्षात चार सार्वजनिक सुट्ट्या रविवारीच आल्या आहेत. यामध्ये १५ ऑक्टोबर-घटस्थापना, १२ नोव्हेंबर-लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, १४ एप्रिल-डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती, २१ एप्रिल-महावीर जयंती यांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांच्या या चार सार्वजनिक सुट्ट्या कमी झाल्या आहेत.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.