नैसर्गिक आपत्तीचा विदर्भ आणि मराठवाड्याला फटका

छत्रपती संभाजीनगर : सलग तिसर्‍या दिवशी गारपीट व अवकाळी पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शेतीचे नुकसान, विजेच्या तारा पडून जीवितहानी झाली आहे.


अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्घटना घडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात मालटेकडी परिसरातील कामठा येथे वीज पडून शेख वजीर शेख चांद या ४५ वर्षीय तर जवाहरनगर तुप्पा येथे हिमाचलचे रहिवासी तारासिंग बाबूराम या ४० वर्षीय व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. भिंत कोसळल्याने व्यंकटी लक्ष्मण दंडलवार या युवकाचा मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. टीनपत्रावरील दगड अंगावर पडल्याने सोनुबाई नंदू पवार या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात वीज पडून गणेश जहाने या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपीट झाली.


सांगोला येथे वावटळीमुळे लाकडी काठ्यांना बांधलेला कापडी पाळणा उडाला व त्यात ठेवलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दगडावर आपटून मृत्यू झाला. जळगावात वावटळीमुळे उभा कंटेनर कलंडून अभियंत्यासह दोन मजूर ठार झाले. गुरुवारी कंटेनरमधून लोखंडी पत्रे काढत असताना वावटळ सुरु झाली. त्यात पत्री शेड, पाच ते सहा दुचाकीही उडून गेल्या. याच वेळी भोला व चंद्रकांत हे दोन मजूर कंटेनरच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. वावटळीत हा कंटेनर कलंडून दोघांच्या अंगावर कोसळून दोघेही जागीच गतप्राण झाले.


अशा दुर्घटना घडत असतानाच हवामान खात्याने पुढील आणखी काही दिवस मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी