बारसू पेटले! पण माथी कोण भडकवतंय?

शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन


राजापूर : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवले. आता या ग्रामस्थांची माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्याच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे, असे राज्याचे उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.


रिफायनरी प्रकल्पाला नाणारऐवजी बारसू येथील जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला केंद्राला पत्र लिहून सुचवली होती. ते पत्र लिहिण्याआधी त्यांनी स्थानिकांचा विचार करायला हवा होता. त्यावेळी ग्रामस्थांना विचारून पत्र देणे गरजेचे होते. पण तेव्हा कणताही विचार केला नाही. त्या पत्रानुसारच आता सर्वेक्षण सुरू झाले तर आंदोलनकर्त्यांच्या बाजूने आपण आहोत हे दाखवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतायेत, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.



हे पण वाचा : बारसूमधील आंदोलकांना पोलिसांनी अडवले


मंत्री उदय सामंत म्हणाले की, प्रशासनाचे अधिकारी लोकांशी चर्चा करायला तयार आहेत. चर्चा सुरूही आहेत. गवताला आंदोलनकर्त्यांनी आग लावली तो वणवा पोलिसांनी विझवला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केलेला नाही. प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरू आहे. अद्याप प्रकल्प करायचा की नाही हे ठरले नाही. कुठेही पोलीस कारवाईचा बडगा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. काम करणारी माणसेच आहेत. चर्चेला वाव आहे. माती सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रकल्प तिथे येणार की नाही हे कळेल, असे त्यांनी सांगितले.


तसेच माथी कोण भडकवतंय हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु राज्याच्या उद्योगधंद्यादृष्टीने हे चिंताजनक आहे. शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यास सरकार तयार आहे. लोकांना जे आवश्यक आहे ते करायला तयार आहे. माती परिक्षण झाले म्हणजे प्रकल्प होणार असे नाही. अद्याप पुरेसा वेळ आहे लोकांची चर्चा सुरू आहे. आम्हीदेखील तिथे जाऊ शकलो असतो परंतु राजकीय वातावरणामुळे तणाव आणखी बिघडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. लोकांच्या मनातील संशय दूर झाल्याशिवाय सरकार प्रकल्प पुढे रेटून नेणार नाही, असेही आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.


दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात होती. मात्र तत्पूर्वी खासदार विनायक राऊत यांच्यासह ७ पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली. बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे.


संबंधित बातम्या...

अश्रूधूर नव्हे आंदोलकांनी वणवा लावल्याचा उदय सामंत यांचा दावा

सर्व शंकांचे निरसन करूनच ‘बारसू’ प्रकल्प पुढे नेणार

ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार?
Comments
Add Comment

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या