लोकांना विश्वासात घेऊन रिफायनरी होणारच

कणकवली (प्रतिनिधी) : लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू येथील रिफायनरी प्रकल्प होणार नाही. बारसू किंवा नाणारचा भाग वगळून देवगड, राजापूर हे जे जुने प्रस्तावित भाग आहेत, तिथे सगळीकडे एकत्र म्हणून तो प्रकल्प येणार आहे.आजपर्यंत बारसू येथे फक्त सॉईल टेस्टिंग सुरू आहे. यानंतर प्रकल्प जागा निश्चिती होणार आहे. लोकांना विश्वासात घेऊनच सर्व काही होणार आहे. असे सांगताना आ. नितेश राणे यांनी जनतेने आंदोलन उभारण्यापर्यंत अजून तेवढा प्रकल्प काही सुरू झालेला नाही,असे मत व्यक्त केले.



कणकवली येथील नगरपंचायत कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील सर्व प्रतिनिधींची भूमिका रिफायनरी बाबत स्पष्ट असल्याचे सांगितले.



रिफायनरी प्रकल्प केंद्र सरकारचा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या प्रकल्पासंदर्भात चर्चा केली आहे. त्याचबरोबर संबंधित मंत्र्यांना देखील ते भेटलेले आहेत. त्यावेळी माजी आमदार प्रमोद जठार तसेच माजी खासदार निलेश राणे देखील होते. त्याही ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊनच केंद्र सरकार व राज्य सरकार रिफायनरी प्रकल्प राबवणार असल्याचे ठरले. त्यामुळे यात कोणाला आंदोलन करण्याची काही गरज भासणार नाही, असे स्पष्ट मत आ. नितेश राणे यांनी व्यक्त केले.


आता रिफायनरी होणारच!
पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, एका बाजूला राऊत आणि त्यांचे इतर काही लोक प्रकल्पाला विरोध करतात आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांच्याकडून खर्च मागतात? हे कसं होणार? असाही सवाल आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांना केला आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही पोटावर लाथ मारून, कोणताही विरोध सहन करून काही होणार नाही. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच बारसू असेल, नाणार वगळून जो राजापूरचा भाग असेल आणि देवगडचा भाग या ठिकाणी सगळीकडे ग्रीन रिफायनरीचा प्रकल्प होणार आणि त्याला थांबवण्याचे आता कोणामध्ये ताकत नाही, अशा प्रखर शब्दांत आमदार नितेश राणेंनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.


स्वतःची किंमत वाढवण्यासाठी राऊत, नाईक यांचे प्रयत्न
जे विरोध करत आहेत विशेषतः खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक हे स्वतःची किंमत वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. खा. राऊत जे उदय सामंत यांच्यावर टीका करतात तेच विनायक राऊत दिवसातून किती वेळा उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन करतात? आणि काय काय बोलतात? याचा आता तपशील जाहीर करणार असल्याचे आ. नितेश राणे यांनी सांगितले. जर विनायक राऊत यांना मी केलेले स्टेटमेंट जर खोटं वाटत असेल तर खासदार राऊतांनी आपल्या एका महिन्याचं कॉल रेकॉर्ड (रिपोर्ट) जाहीर करावा, असा थेट इशाराच आमदार नितेश राणे यांनी यावेळी खासदार राऊतांना दिला आहे.

Comments
Add Comment

Mahesh Dixit Appointed IB Chief : महेश दीक्षित यांची आयबी (IB) प्रमुखपदी नियुक्ती; कोण आहेत हे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्त्वाची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau-IB) च्या

FIFA World Cup 2026 Neymar : ९८१ दिवसांनंतर ब्राझीलसाठी मैदानात उतरला नेमार, चाहत्यांचा जल्लोष

इंग्लंड : ब्राझील विरुद्ध स्कॉटलंड (Brazil vs Scotland) सामन्यात तब्बल ९८१ दिवसांनंतर स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar) याने

Women's T20 World Cup : शेफाली वर्माची दमदार अर्धशतकी खेळी; भारताने बांगलादेशला ५ गडी राखून हरवलं

इंग्लंड : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने

India vs Ireland T20I : महिला विश्वचषकामुळे भारत-आयर्लंड सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या कसं असेल नवीन वेळापत्रक?

मुंबई : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) मालिकेपूर्वी मोठा निर्णय

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि