बड्या बांधकाम व्यावसायिकांचा ३,३३३ कोटींचा गैरकारभार उघडकीस

नाशिक : आयकर विभागाच्या पथकाने नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर गेले सहा दिवस छापे टाकले. २० एप्रिल रोजी पहाटे सहाच्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई २५ एप्रिलला संपली. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले, तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आयकर विभागाची राज्यभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.


नाशिक शहरात बड्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरु असून त्यात लेखी उलाढाल फार कमी दाखवून दिशाभूल केल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होते. कुणालाही संशय येऊ नये, यासाठी अधिकारी वेगवगेळ्या ठिकाणाहून कारमधून दाखल झाले. ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांकडून बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकण्यात आले.


दरम्यान नाशकातीलच काही पथकांनी ईगतपुरी शहरात एका बड्या लाॅटरी व्यावसायिकाकडे छापा टाकला असता सुमारे ७० ते ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती