उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने खानदेश महोत्सवाचे आयोजन

कल्याण : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे पर्यंत खानदेश महोत्सवाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपविभाग मैदान, वसंत व्हॅली येथे करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम असतील. त्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना खानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


महोत्सवात खवय्यांसाठी खानदेशातील कडी हुणके, खापरावरची मांडी असे विविध प्रसिध्द खाद्य पदार्थ असणार आहेत.  शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, महिला बचत गटांना संधी देणे हा उद्देश ग्लोबल खानदेश महोत्सव आयोजित करण्यामागे असल्याचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी खजिनदार ए. जी. पाटील, सल्लागार अण्णा पाटील, महिला मंडळ अध्यक्ष भारती वानखेडकर, सांस्कृतिक प्रमुख विनोद शेलकर, प्रदीप अहिरे, वर्षा पाटील, सुनिता बोरसे, विद्या अहिरे, यश महाजन, रतिलाल कोळी, ठानसिंग पाटील, विजय पाटील, विनोद शिंदे, मिलिंद बागुल, प्रभाकर बोरसे इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील