उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने खानदेश महोत्सवाचे आयोजन

कल्याण : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे पर्यंत खानदेश महोत्सवाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपविभाग मैदान, वसंत व्हॅली येथे करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम असतील. त्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना खानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


महोत्सवात खवय्यांसाठी खानदेशातील कडी हुणके, खापरावरची मांडी असे विविध प्रसिध्द खाद्य पदार्थ असणार आहेत.  शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, महिला बचत गटांना संधी देणे हा उद्देश ग्लोबल खानदेश महोत्सव आयोजित करण्यामागे असल्याचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी खजिनदार ए. जी. पाटील, सल्लागार अण्णा पाटील, महिला मंडळ अध्यक्ष भारती वानखेडकर, सांस्कृतिक प्रमुख विनोद शेलकर, प्रदीप अहिरे, वर्षा पाटील, सुनिता बोरसे, विद्या अहिरे, यश महाजन, रतिलाल कोळी, ठानसिंग पाटील, विजय पाटील, विनोद शिंदे, मिलिंद बागुल, प्रभाकर बोरसे इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये