म्हाडाच्या अनामत रकमेत वाढ!

  156

अर्ज करणे महागल्याने अल्प-अत्यल्प गटांमध्ये नाराजी


मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२३च्या सोडतीसाठी अनामत रक्कमेत वाढ करणार नसल्याचे याआधी जाहीर केले होते. ही सूचना अत्यल्प व अल्प गटासाठी लागू होती. परंतु आता अत्यल्प व अल्पसह सर्व उत्त्पन गटाच्या अनामत रक्कमेत वाढ केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


२०२३ मध्ये म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, अत्यल्प गटासाठी २५ हजार, अल्प गटासाठी ५० हजार, मध्यम गटासाठी एक लाख रूपये तर उच्च गटासाठी दीड लाख रूपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.


भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडती नंतरची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन केली आहे. तसेच नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. रक्कम वाढल्यामुळे या दोन्ही मंडळाच्या सोडतीला सुद्धा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.


म्हाडाकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. मात्र अनामत रक्कमेत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.


सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. उत्पन्न गटांवर आधारित, राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. इडब्ल्यूएस, एलआयजी, एचआयजीमध्ये हे विभागलेले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.