म्हाडाच्या अनामत रकमेत वाढ!

  166

अर्ज करणे महागल्याने अल्प-अत्यल्प गटांमध्ये नाराजी


मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०२३च्या सोडतीसाठी अनामत रक्कमेत वाढ करणार नसल्याचे याआधी जाहीर केले होते. ही सूचना अत्यल्प व अल्प गटासाठी लागू होती. परंतु आता अत्यल्प व अल्पसह सर्व उत्त्पन गटाच्या अनामत रक्कमेत वाढ केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


२०२३ मध्ये म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, अत्यल्प गटासाठी २५ हजार, अल्प गटासाठी ५० हजार, मध्यम गटासाठी एक लाख रूपये तर उच्च गटासाठी दीड लाख रूपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केली जाणार आहे. याचा प्रस्ताव लवकरच म्हाडा उपाध्यक्षांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.


भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोडती नंतरची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन केली आहे. तसेच नव्या प्रक्रियेसह सोडत काढताना पुणे आणि कोकण मंडळाने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. रक्कम वाढल्यामुळे या दोन्ही मंडळाच्या सोडतीला सुद्धा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.


म्हाडाकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. मात्र अनामत रक्कमेत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.


सर्व नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. उत्पन्न गटांवर आधारित, राज्य सरकार लॉटरी प्रणाली आयोजित करते. इडब्ल्यूएस, एलआयजी, एचआयजीमध्ये हे विभागलेले आहेत.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड