आज ईद आणि अक्षय्य तृतीया सोन्याचे दर जाणून घ्या

  271

मुंबई: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया आज देशासह राज्यात अक्षय्य तृतीया सण उत्साहात साजरा होत आहे. आज सराफा बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. सोन्याच्या विक्रमी वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ६० हजार १९१ रुपयांवर येऊन पोहोचली आहे. सोन्याच्या दरात ४२५ रुपयांनी घसरण झाली आहे.


मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे जरी सराफा बाजारात गर्दी असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ही गर्दी कमी आहे. मात्र, ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकत्र आल्याने सोन्याची मोठी खरेदी होईल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.


दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारीही चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव ६४६ रुपयांनी घसरून ७४ हजार ७७३ रुपये प्रति किलोवर आला आहे. -



देशातील दोन प्रमुख शहरांतील चांदीचे आणि सोन्याचे दर


दिल्ली: २४ कॅरेट सोने - ६१ हजार ३०० रुपये, २२ कॅरेट सोने - ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम
मुंबई: २४ कॅरेट सोने - ६१ हजार १५० रुपये, २२ कॅरेट सोने - ५६ हजार ०५० रुपये प्रति १० ग्रॅम


दिल्ली : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो
मुंबई : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)