उर्फी आणि गौतमीवर कारवाई शक्य नाही! कारण? रुपाली चाकणकर स्पष्टच बोलल्या

पुणे: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातले घमसान असो की गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमांत होणारे गोंधळ. या दोघींवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न वेळोवेळी विचारला जातो. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी याचे उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, शील व अश्लील याची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. परिभाषा स्थळ, काळ वेळपरत्वे बदलते. यासंदर्भात कोणतीही स्पष्ट व्याख्या कायद्यात नाही. त्यामुळे उर्फी जावेद आणि गौतमी पाटील या दोघी तुमच्या दृष्टीकोनातून अश्लील वाटत असल्या तरी दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही.


रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या, गौतमी पाटील करतेय ते नृत्य नाही, पण या प्रकरणात राज्य महिला आयोगाला ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य महिला आयोग संबंधित व्यक्ती, संबंधित विभाग किंवा संस्था यांच्याकडे पाठवतात. पण राज्यघटनेने तुम्हाला, मला जो व्यक्तिस्वातंत्र्याचा, भाषा स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणी काय घालावे, कोणी काय बोलावे, कोणी काय खावे, हे कोण कुणाला सांगू शकत नाही.


रुपाली चाकणकर म्हणाल्या, याप्रकरणी आपण त्यांना समज देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था पाहता त्यासाठीचे काही परिमाण ठरले आहेत, त्यापलीकडे जाऊन आपण कोणतीही कारवाई करू शकत नाही.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या