दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार!

पुणे : बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा महाराष्ट्रातील संभाव्य राजकारणात दोन दिवसात मोठं काहीतरी घडणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे काही आमदारांसह फुटून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. राजकीय नेत्यांना जिथं-तिथं हेच प्रश्न विचारले जात आहेत. अजित पवार यांनी काल या चर्चा फेटाळल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या दोन दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


त्या पत्रकारांशी बोलत होत्या. येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असे त्या म्हणाल्या. त्यातली एक दिल्लीत होईल आणि दुसरी महाराष्ट्रात होईल, असे त्या म्हणाल्या.


अजित पवार हे भाजपसोबत जाणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर, 'हा प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारा. माझ्याकडे गॉसिप करण्यासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे. त्यामुळे या गोष्टींबद्दल मला फारशी माहिती नाही. अजितदादा हे काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अशी विधाने केली जातात, अशी पुस्तीही सुप्रिया सुळे यांनी जोडली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर