हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे काढून हातात देईन...

आमदार नितेश राणे यांचा जळजळीत इशारा


अहमदनगर: अहमदनगरमध्ये कापड बाजारात झालेल्या दोन हिंदू व्यापाऱ्यांवरील हल्ल्याचा समाचार घेत, आमदार नितेश राणे यांनी आमच्या हिंदू व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहाल तर डोळे काढून हातात देईन, असा घणाघाती इशारा दिला आहे. मिट्टी में मिला देंगे फक्त युपीमध्ये होत नाही तर महाराष्ट्रात देखील होतं. आमच्याकडे पण मेडिकल चेकअपला घेऊन जातात. आमच्याकडे पण पत्रकार आणले जातात असाही जळजळीत इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.


आज नगर येथील कापड बाजारात नितेश राणे यांना तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी निवेदन दिले त्यानंतर नितेश राणे यांनी तिथे सभा घेतली व अतिक्रमण करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. कापड बाजारातील अतिक्रमणांचा समाचार घेत नितेश राणे म्हणाले, इथे एक दिवस अतिक्रमण हटवली जातात ती पुन्हा येथे येऊन बसतात. यांच्या दुकानांमध्ये हत्यार असतात ती काय आमची सत्यनारायणाची पुजा घालायला ठेवली आहेत का? माझ्या हिंदू व्यापाऱ्यांना येथे स्वसंरक्षणासाठी बंदूका मिळवायला मला दोन-दोन महिने पाठपुरावा करावा लागतो, या शब्दांत नितेश राणे यांनी पोलिसांचाही समाचार घेतला.

ते पुढे म्हणाले, पोलिसांनी क्रॉस केसेस टाकल्या त्या का टाकल्या ते आम्हाला कळत नाही का. इथे रस्त्याने चालणाऱ्या माझ्या महिला भगिनींवर कमेंट्स पास करणाऱ्यांना दोन पायावर घरी जाता येणार नाही. मी काय इथे आमदार म्हणून फक्त शो करायला आलेलो नाहीये तर पूर्ण तयारीनीशीच आलो आहेच अशी चेतावनीच नितेश राणे यांनी दिली. यांचा एकदाच जयश्रीराम करायचा जर पोलिसांनी तुम्हाला सहाकार्य केलं नाही तर यांचा हर हर महादेव करायची वाट पाहू नका असेही नितेश राणे यांनी म्हटले.

नितेश राणे यांनी, ते कोरोनाचं वॅक्सीन असतं ना तसं माझ्याकडेही वॅक्सीन आहे ते आता बाहेरच काढतो. फक्त कोरोनाचं वॅक्सीन हातावर देतात मी ढुंगीवर देतो, असा कडकडीत इशारा देत येथील हिंदू व्यापाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे आणि यापुढे तुम्हाला तक्रार करावी लागणारच नाही असा शब्द दिला.
Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू