या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवा

सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले


नवी दिल्ली : न्यायालयाचे आदेश डावलून झाडे तोडल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑथोरिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना न्यायालयात उभे करा आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले.


मुंबईतील आरे जंगलातील झाडे तोडल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमआरसीएल) चांगलेच फटकारले. सुप्रीम कोर्टाने काही आदेश मागच्या वेळेस दिले होते. त्याचा अवमान झाल्याने सुप्रीम कोर्टाने एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.


तुम्ही न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाही. तुम्ही कोर्टाचे आदेश व कोर्टाला डावलू शकत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या समोर या अधिकाऱ्यांना उभे करा व या ऑथोरिटीचे जे अध्यक्ष आहेत, त्यांना देखील उभे करा, असे म्हणत सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीष डी. वाय. चंद्रचूड यांनी प्राधिकरणाला सुनावले. तसेच अशा लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले.


मुंबई मेट्रो प्राधिकरण हे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चालते. ८४ झाडे तोडण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली होती. पण १८५ झाडे तोडण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यात अधिकारी हे दोषी आहेतच पण मुंबई मेट्रो प्राधिकरणाला देखील न्यायालयाने तितकेच जबाबदार ठरवले आहे.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य