कवी आले, कवी!...म्हणाले, एकनाथ शिंदे रडले म्हणून उद्धव ठाकरे तोंडावर पडले

  266

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले या आदित्य ठाकरेंच्या आरोपाला शिंदे समर्थकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर युतीचा घटक पक्ष असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही त्यांच्या खुमासदार शैलीत ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 'एकनाथ शिंदे रडले, म्हणून उद्धव


ठाकरे तोंडावर पडले'. अशी चारोळी म्हणत या मुद्द्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
रामदास आठवले म्हणाले की, रडण्याचा विषय नाही. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. तो रडणारा माणूस नाही. तो खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. रडणारे काम त्यांच्याकडून होईल असं वाटत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे रडले असा आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली म्हणून शिंदेंनी बंड केले.


आठवले यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, अजित पवार भाजपात जातील असं वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले आहेत. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचा होणार नाही. कारण तेवढे आमदार नाहीत. पण राजकारणात काही होऊ शकते. आमच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद दिले तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देऊ, या शब्दांत मुख्यमंत्री पदाचीऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता