दिल्लीकडून नकोसा विक्रम आणखी भक्कम

  175

आयपीएलच्या इतिहासात २५व्यांदा सर्वबाद


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग चार सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने एक नकोसा विक्रम आणखी मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ सर्वबाद झाला. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीचा संघ २५व्यांदा सर्वबाद झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा ऑलआऊट होण्याचा विक्रम दिल्लीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आणखी भक्कम केला.


दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सर्वबाद झालेला संघ आहे. दिल्लीचा संघ २५व्यांदा आयपीएल सामन्यात ऑलआऊट झाला. या नकोशा विक्रमात आधीच संघ अव्वल होता आणि आता पुन्हा एकदा ऑलआऊट झाल्यामुळे संघाचा हा लाजिरवाणा विक्रम आणखी भक्कम झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो २३ वेळा ऑलआऊट झाला आहे.


आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ वेळा ऑलआऊट झालेली राजस्थान रॉयल्स या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत चौथे नाव पंजाब किंग्जचे आहे. पंजाबच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात २० वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स १९ वेळा ऑल आऊट झाला आहे. मुंबई इंडियन्सने १८ वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंत १० वेळा ऑलआऊट झाला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्ज हा एकमेव संघ आहे, ज्याने ४ विजेतेपद जिंकले आहेत आणि १४ हंगामात केवळ ९ वेळा ऑलआऊट झाला आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन