मुरबाडमध्ये चौथ्यांदा अवकाळी पावसाचा दणका!

  213

घरांचे छप्पर उडाले, झाडे उन्मळून पडली, कडधान्ये, भाजीपाला व वीट भट्टीचे नुकसान


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे भाजीपाला, कडधान्य तसेच वीटभट्टीचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.


तालुक्यातील कोरावळे गावात वादळ वाऱ्याचा जोरदार फटका बसला. संजय धुमाळ, काळूराम मोरे, बंदु राऊत यांच्यासह अनेक घरांच्या घरावरील छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.


रस्त्याच्या कडेला असणारे मोठे झाड उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक बंद होती. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.


मागील तीन वेळा अवकाळी पावसाने झटका दिल्याने अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हेच कळत नाही, अशा प्रकारच्या व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहेत.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Ajit Pawar: माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं!

पुणे: प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पारडं

Passenger Jump from Plane: आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी विमानातून मारल्या उड्या, १८ जण जखमी; कुठे घडली ही घटना? जाणून घ्या

स्पेन: गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर, विमानांच्या लहान-मोठ्या अपघातांबद्दलच्या

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या