मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे भाजीपाला, कडधान्य तसेच वीटभट्टीचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.
तालुक्यातील कोरावळे गावात वादळ वाऱ्याचा जोरदार फटका बसला. संजय धुमाळ, काळूराम मोरे, बंदु राऊत यांच्यासह अनेक घरांच्या घरावरील छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याच्या कडेला असणारे मोठे झाड उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक बंद होती. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
मागील तीन वेळा अवकाळी पावसाने झटका दिल्याने अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हेच कळत नाही, अशा प्रकारच्या व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहेत.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…