मुरबाडमध्ये चौथ्यांदा अवकाळी पावसाचा दणका!

Share

घरांचे छप्पर उडाले, झाडे उन्मळून पडली, कडधान्ये, भाजीपाला व वीट भट्टीचे नुकसान

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे भाजीपाला, कडधान्य तसेच वीटभट्टीचे नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे.

तालुक्यातील कोरावळे गावात वादळ वाऱ्याचा जोरदार फटका बसला. संजय धुमाळ, काळूराम मोरे, बंदु राऊत यांच्यासह अनेक घरांच्या घरावरील छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

रस्त्याच्या कडेला असणारे मोठे झाड उन्मळून पडल्याने जवळपास दोन तास वाहतूक बंद होती. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरू झाली.

मागील तीन वेळा अवकाळी पावसाने झटका दिल्याने अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने मोठ्या प्रमाणात बरसात केल्याने ऐन मार्च, एप्रिलमध्ये पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हेच कळत नाही, अशा प्रकारच्या व्यथा शेतकरी वर्ग मांडत आहेत.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

24 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

44 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

1 hour ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago