५ विकेट राखून सुपर जायंट्सचा मोठा विजयी

Share

लखनऊच्या फिरकीपुढे हैदराबाद गारद

लखनऊ (वृत्तसंस्था) : लखनऊच्या कृणाल पंड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादचा संघ निष्प्रभ ठरला. अवघे १२२ धावांचे लक्ष्य लखनऊने ५ विकेट गमावून सहज गाठत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबादने लखनऊला १२२ धावांचे माफक आव्हान दिले होते. ४२ धावांवर लखनऊचे २ फलंदाज माघारी परतले होते. लोकेश राहुल आणि कृणाल पंड्या यांनी चांगली भागीदारी करत लखनऊला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. लोकेशने ३५, तर पंड्याने ३४ धावा केल्या. मार्कस स्टॉयनीस आणि निकोलस पुरन यांनी नाबाद खेळी खेळत लखनऊला विजय मिळवून दिला. १६ षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात लखनऊने विजयी लक्ष्य गाठले. हैदराबादच्या आदील रशीदने सर्वाधिक २ बळी मिळवले. लखनऊने या सामन्यात सोपा विजय मिळवला. लखनऊने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. शुक्रवारच्या या विजयामुळे लखनऊने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित २० षटकांत हैदराबादने ८ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावा केल्या. कृणाल पंड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कृणाल पंड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोईने एक विकेट घेतली. या तिन्ही फलंदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पंड्याने चार षटकांत अवघ्या १८ धावा दिल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त १६ धावा दिल्या. अमित मिश्राने चार षटकांत २३ धावा दिल्या. हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्याला यश ठाकूरने बाद केले. अनमोलप्रित सिंगने ३१ धावांचे योगदान दिले. हैदराबादचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. हैदराबादच्या उर्वरित फलंदाजांमध्ये मयंक अग्रवालने ८, हॅरी ब्रूकने ३, वॉशिंग्टन सुंदरने १६ आणि आदिल रशीदने ४ धावा केल्या. उमरान मलिक आणि एडन मार्कराम यांना खातेही उघडता आले नाही. अब्दुल समदने १० चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

7 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

7 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

9 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 hours ago