तुम्ही उद्योजक झालात तर मला समाधान मिळेल, नारायण राणे यांचा कोळी बांधवांना संदेश

  299

लोणावळा : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आपल्याला उद्योजक बनविण्याकरिता कटिबद्ध असून आपल्या समाजातील महिलांनी देखील सक्षम झाले पाहिजे असे सांगितले आणि तुम्ही उद्योजक झाला तर त्याचे मला समाधान मिळेल. कोळी समाजातून उद्योजक निर्माण व्हायला हवेत. केवळ मासेमारी नकोच तर माशांपासूनच्या विविध प्रक्रीया उद्योगातही सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. स्वयंरोजगार मेळावा आदिवासी कोळी व मच्छीमार समाजाने उद्योजक बनावे यासाठी आयोजित केला असल्याचे सांगून समाजाने आपली गरिबी नष्ट करण्याकरीता रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन आपली प्रगती करावी, असे मार्गदर्शन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.


ते भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले की, उद्योग हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो. सुखी समाधानी, आनंदी जगायचं असेल आणि पुढील पिढी सक्षम करायची असेल तर उद्योगाशिवाय मार्ग नाही. मीदेखील १३ वर्षे नोकरी केली. पण मला कळलं की हे माझं काम नाही. दीड ते दोन हजार पगार मिळायचा. तोही घरी पोहचेपर्यंत मित्र भेटले की संपायचा. मी मुंबईत अनेक व्यवसाय केलेत. नारायण राणे हे नाव फार मोठं वाटते. पण मी छोटे अनेक व्यवसाय केले. मराठी माणूस आपले काम नाही म्हणून जो व्यवसाय करत नाही तोही केला. रस्त्यावर फटाके मटण, चिकनचा व्यवसाय केला.


माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही, असे मतही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.


Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण