तुम्ही उद्योजक झालात तर मला समाधान मिळेल, नारायण राणे यांचा कोळी बांधवांना संदेश

लोणावळा : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आपल्याला उद्योजक बनविण्याकरिता कटिबद्ध असून आपल्या समाजातील महिलांनी देखील सक्षम झाले पाहिजे असे सांगितले आणि तुम्ही उद्योजक झाला तर त्याचे मला समाधान मिळेल. कोळी समाजातून उद्योजक निर्माण व्हायला हवेत. केवळ मासेमारी नकोच तर माशांपासूनच्या विविध प्रक्रीया उद्योगातही सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. स्वयंरोजगार मेळावा आदिवासी कोळी व मच्छीमार समाजाने उद्योजक बनावे यासाठी आयोजित केला असल्याचे सांगून समाजाने आपली गरिबी नष्ट करण्याकरीता रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन आपली प्रगती करावी, असे मार्गदर्शन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.


ते भाजपा आणि कोळी महासंघ यांनी आयोजित केलेल्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले की, उद्योग हा माणसाला प्रगतीकडे घेऊन जातो. सुखी समाधानी, आनंदी जगायचं असेल आणि पुढील पिढी सक्षम करायची असेल तर उद्योगाशिवाय मार्ग नाही. मीदेखील १३ वर्षे नोकरी केली. पण मला कळलं की हे माझं काम नाही. दीड ते दोन हजार पगार मिळायचा. तोही घरी पोहचेपर्यंत मित्र भेटले की संपायचा. मी मुंबईत अनेक व्यवसाय केलेत. नारायण राणे हे नाव फार मोठं वाटते. पण मी छोटे अनेक व्यवसाय केले. मराठी माणूस आपले काम नाही म्हणून जो व्यवसाय करत नाही तोही केला. रस्त्यावर फटाके मटण, चिकनचा व्यवसाय केला.


माणसाला प्रगती करायची असेल तर लाज लज्जा बाळगून चालत नाही, असे मतही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.


Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण