जुलाब, त्वचारोग आणि उलट्या....रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?

कल्याणमध्ये दुषित पाण्यामुळे नागरिकांना करावा लागतोय आजारांचा सामना


कल्याण : कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शिवाजी नगर, संतोषी माता मंदिर परिसरातील रोकडे चाळीत राहणारे नागरिक दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पित आहेत. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब आणि त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे. येथे टाकण्यात आलेली पाण्याची लाईन तब्बल ४० वर्षे जुनी असून एकदाही देखभाल न झाल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे तसेच उपअभियंता सोनवणे यांना वारंवार तक्रार करूनही यात काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


शिवाजी नगर परिसरातील ही पाईपलाईन ड्रेनेज लाईन मधून गेली आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने हि पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी पिण्यावाचून पर्याय नाही.


पाहा नागरिक या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल काय सांगत आहेत....


या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे समस्या मांडल्यावर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि समस्या निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.


याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना विचारले असता, पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या टॅपिंग केल्याने ड्रेनेज मधील पाणी याठिकाणी झिरपत असून नागरिकांची हि समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

येसूबाई' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तुळजापुरात

धाराशिव : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता