जुलाब, त्वचारोग आणि उलट्या....रोकडे चाळकऱ्यांच्या समस्या कधी संपणार?

कल्याणमध्ये दुषित पाण्यामुळे नागरिकांना करावा लागतोय आजारांचा सामना


कल्याण : कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील शिवाजी नगर, संतोषी माता मंदिर परिसरातील रोकडे चाळीत राहणारे नागरिक दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पित आहेत. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब आणि त्वचारोगांना सामोरे जावे लागत आहे. येथे टाकण्यात आलेली पाण्याची लाईन तब्बल ४० वर्षे जुनी असून एकदाही देखभाल न झाल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे तसेच उपअभियंता सोनवणे यांना वारंवार तक्रार करूनही यात काहीच कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.


शिवाजी नगर परिसरातील ही पाईपलाईन ड्रेनेज लाईन मधून गेली आहे. पाईपलाईन जुनी झाल्याने हि पाईपलाईन जीर्ण झाली असून यामध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपते. हेच गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरात येत असल्याने नागरिकांना हे गढूळ पाणी पिण्यावाचून पर्याय नाही.


पाहा नागरिक या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबद्दल काय सांगत आहेत....


या समस्येबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे समस्या मांडल्यावर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि समस्या निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.


याबाबत कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांना विचारले असता, पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या टॅपिंग केल्याने ड्रेनेज मधील पाणी याठिकाणी झिरपत असून नागरिकांची हि समस्या तात्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'