मुंबई-ठाण्यात शिवसेना-भाजपच्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात

मुंबई/ठाणे: भाजप- शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला दादर, अंधेरी, वांद्रे आणि ठाण्यात सुरुवात झाली आहे. ठाण्यातील यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतीमेचं पूजन केलं अन् यात्रेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी रथयात्रेतही सहभाग घेतला आहे. मुंबईमधील यात्रेचं नेतृत्व भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करत आहेत.


काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याबद्दल त्या विरोधात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून राज्यभरातील विविध जिल्ह्यात ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला या यात्रेची सांगता होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कांदिवली पश्चिम येथे निघणाऱ्या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी होऊन उपस्थित नागरिकांना संबोधित करणार आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. याच शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा देखील काढली जाणार आहे. या यात्रेला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज छत्रपती संभाजी नगरमध्ये सभा आणि यात्रा यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

Comments
Add Comment

स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज