मालवणी परिसरात दोन गटांमध्ये दंगल; पोलिसांकडून लाठीचार्ज, २५ जण ताब्यात

Share

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड येथील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभा यात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतलं आहे, तर २०० ते ३०० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं समजतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मालवणी येथे रामनवमीनिमित्त भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये घोषणाबाजीवरुन तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.

लोकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये

दरम्यान, याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. तणाव निर्माण झालेल्या परिसरासह आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू होतं. तसेच, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवावी, असं आहवानही पोलिसांनी केलं आहे.

Recent Posts

शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाची घरे देणार – बावनकुळे

मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…

10 minutes ago

Black Tiger : दुर्मिळ काळे वाघ पाहायचेत; ‘या’ ठिकाणी नक्की भेट द्या!

मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात…

42 minutes ago

ड्रग्ज डॉनच्या बापाची आत्महत्या! आत्महत्येच्या चिठ्ठीत धक्कादायक आरोप! नवी मुंबईत खळबळ

नवी मुंबई : भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचा म्होरक्या नवीन चिचकरचे वडील आणि नामांकित बांधकाम…

1 hour ago

‘उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे’

मुंबई : मुंबईतील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून बेस्टची ओळख आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होण्यासाठी…

2 hours ago

Kartik Aaryan Naagzilla Movie : फन फैलाने आ रहा हू… कार्तिक आर्यनचा नागराज अवतार!

'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : करण जोहरने (Karan Johar) नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाची…

2 hours ago

वक्फ कायद्यात बदल गरजेचाच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ ला (Waqf Amendment Act 2025) आव्हान देणाऱ्या याचिकांवर…

2 hours ago