राजापूर : राजापूर तालुक्यातील होळीचा मांड धामणपे येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या शर्यतीमध्ये ‘विना फटका’चा प्रयोग ही अट प्रत्येक स्पर्धकाला घातली गेली आहे.
या बैलगाडी शर्यती संदर्भात धामणपे ग्राम विकास मंडळ, मुंबईचे सरचिटणीस संजय तावडे म्हणाले की, न्यायालयाच्या नियम अटींचे पालन करीत या शर्यती पार पडणार आहेत. ही बैलगाडी शर्यत मधुकरराव गोमणे यांनी पुरस्कृत केली आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित रहाणार आहे. या बैलगाडी विजेतेपद पटकाविणाऱ्यांना प्रथम क्रमांकाला ३० हजाराचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाला २५ हजाराचे बक्षीस तर तृतीय क्रमांकाला २० हजाराचे बक्षीस व मानाची ढाल देण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिके व मानाची ढाल देण्यात येणार आहे.
बैलगाडा शर्यतीचा प्रचंड उत्साह असून मुंबईकर चाकरमानी सुद्धा या शर्यती पहाण्यासाठी निघाले आहेत.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…